आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध

"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येतेे. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर, माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १ सप्टेंबर १९५१, औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याच्या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणातून.

1 comment:

  1. Very Nice 👍 Salute to Your Work 🙏

    ReplyDelete

Suggestions are most welcome