नेहमीच जुने ते सोने म्हणून चालणार नाही

सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्यांच्या मुलांनी करावे हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदललल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण कधीही समर्थ होणार नाही. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगतीबरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे अवश्य आहे. तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. विधायक कार्य केल्याशिवाय इतका वेळ गेला आहे की जास्त वेळ जाऊ देणे हे आपल्या बर्‍याचे होणार नाही. या प्रांतातील आपल्या लोकांत शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही.
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome