सामाजिक विषमता लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत

सामाजिक विषमता लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

"जर तुम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केलीत तर तुम्हाला असे आढळून येईल की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे, याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
(१९५२)
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

#बाबासाहेब #आंबेडकर #जयंती_२०१९

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
एल्फिन्स्टन काॅलेज, १५ डिसेंबर १९५२
"उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची काॅलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्त्वज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने जगाची उभारणी केली, किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्ल्स यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे."
"मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मुल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमुल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे."
"पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
जनता: २० डिसेंबर १९५२
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************
#बाबासाहेब #आंबेडकर  #जयंती_2019

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
हैद्राबादच्या मुक्कामात दि. १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड' तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे केलेले भाषण:
********************************************
"ज्या लोकांनी ही बोर्डींग काढली आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही.
या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करु शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणा एका युरोपियनाने म्हटले आहे की जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत. (टाळ्या). विद्या ही एक तलवार आहे. या तलवारीने कोणीे कोणाची मान कापतो, तर शीलवान मनुष्य तरवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्धतत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेवून कोणालातरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा, सुट्टीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडिलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोर्डींगला जी आर्थिक मदत मिळत आहे, ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्चित. यासाठी सरकारने कायम स्वरूपाच्या मदतीची सोय केली पाहिजे."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#बाबासाहेब  #आंबेडकर
************
जनता: २० नोव्हेंबर १९५४
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************

The Work of Buddhism is to lessen the suffering of the poor

The work of Buddhism is to lessen the suffering of the poor:

"What is the original foundation of Buddhism? Other religions and the Buddhist religion are different. In other religions, the change will not occur, because those religions tell of a relationship between man and God. Other religions say that God created the world. God created the sky, wind, moon, everything. God did not leave anything left over for us to do. So we should worship God. According to the Christian religion, there is, after death, a Day of Judgment, and all depends on that judgment. There is no place for God and the soul in the Buddhist religion. The Buddha said there is suffering everywhere in the world. Ninety percent of mankind is distressed by sorrow. Suffering mankind should be freed from sorrow-- this is the basic work of Buddhism."    ~Dr. B. R. Ambedkar

सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे

सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
"आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते आहे ते मला माहीत आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की, कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाशीही मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे! पण त्याचे हे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजेच सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या गोष्टी परस्परपूरक नाहीत. (Truth and authority are inconsistent). शास्त्रसुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता (Finality) मान्य करीत नाही. म्हणून सत्यसुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पूर्णतः पवित्र (Sacrosanct) असे काहीच नाही.

सत्य म्हणजेच धर्म आहे हे आम्ही शिकले पाहिजे. 'नहि सत्यात्परो धर्मः' हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये. हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपल्या ह्या काॅलेजचे ध्येय आहे."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

************
मार्च १९४७
************
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणातून:
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

Self-respect is most vital

"You must abolish your slavery yourselves. It is disgraceful to live at the cost of one's self-respect. Self-respect is the most vital factor in life. Without it, man is a mere cipher. To live worthily with self-respect one has to overcome difficulties. It is out of hard and ceaseless struggle alone that one derives strength, confidence, and recognition."

- Dr Babasaheb Ambedkar
(13th April 1929)